शासन निर्णय रावापु-१०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा-३, दिनांक १० सप्टेंबर, २०१२ अन्वये साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कै. विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने सन २०१२-१३ पासून प्रदान करण्यात येत आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रु. ५,००,०००/- (अक्षरी रुपये पाच लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

अधिक माहितीसाठी साहित्य संस्कृती मंडळाच्या पानाची लिंक